पोस्ट्स

अशेरीगड...

इमेज
मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असलेले पालघर जिल्ह्यातील खडकोना गाव. याच गावातून अशेरीगडावर जाण्यासाठी मार्ग आहे. हा गड चढाईला अगदी मध्यम स्वरूपाचा आहे. इतर गडांवर जशी गर्दी असते तशीच गर्दी सुट्टीच्या दिवशी येथे असते. गडाच्या दिशेने जाताना काही ठिकाणी मार्गीका दाखवल्या आहेत. त्या मार्गीकेचा वापर केल्यावर दिशा चुकण्याची शक्यता कमी असते. गडाची पायवाट घनदाट जंगलात आहे. वाटेत काही चौथरे लागतात ते कसले आहेत याबाबत काही कल्पना नाही. घनदाट जंगलाची वाट पार केल्यावर वाघोबा देवाचे स्थान लागते. त्याचे दर्शन घेऊन पुढे गेल्यास कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या वाटेने अगदी सांभाळून पुढे जावे लागते. गडाच्या टोकावर जाण्यासाठी आपल्याला एक लोखंडी जीना लागतो त्या जिन्यावरून आपल्याला माथ्यावर पोचता येते.  माथ्यावर पोचल्यावर आपल्याला एका दगडावर उठावदार असे मुकुट आणि पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह दिसते. या चिन्हावरून येथे पोर्तुगीतांचे वास्तव्य असल्याचे समजते. गडावर पाण्याचे टाके आहेत त्यातील एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. तेथील पाणी ट्रेकर्स मंडळीची तहान भागवते. बालेकिल्ल्याकडे गेल्यावर आपल्याला ...

कळसुबाई ट्रेक...

इमेज
कधी कधी अचानक ठरलेला प्लॅन तुम्हाला सुखद अनुभव देऊन जातो. महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट समजलं जाणारं सर्वात उंच शिखर 'कळसुबाई' येथे सूर्योदय पहायला म्हणे अनेकजण येत असतात त्याच भरतीमध्ये आम्ही पण सामील झालो. पण दिवस निवडला तो अगदी शुक्रवार रात्र आणि शनिवारच्या पहाटेचा. नाईट ट्रेकचा वेगळा अनुभव घ्यायचा होता. आकाशातून दिसणारे ग्रह-तारे.. मागच्यावेळी सावर्णे गावात मोहनच्या 'सुख सह्याद्रीत' नाईट कॅम्पिंगचा अनुभव घेतला होता. मोहननेच बारी गावातील सह्याद्री हॉटेलचे जनार्दन कचरे ह्यांचा संपर्क दिला. मग मुक्काम तिकडेच करायचं ठरलं. बारी गावात आम्ही रात्री एक वाजता पोचलो. तेथून जनाभाऊंच्या घरी आलो. तेच आमचे गाईड असल्यामुळे आम्ही एकमेकांची ओळख करत पहाटे तीनला ट्रेक सुरु करायचे ठरवले. आमच्याकडे तासभर वेळ होता. घराबाहेर खुर्च्या टाकून आम्ही बसलो. आकाशाकडे पाहिलं तर ग्रह-तारे अगदी स्पष्ट दिसत होते. मग नेहमी प्रमाणे मोबाईलमध्ये ऍप ओपन करून ग्रह-तारे चाळत बसलो. तेच चाळता चाळता आमच्या गप्पा सुरु होत्या. शिखरावरून दिसणारा सूर्योदय. पहिलाच नाईट ट्रेक असल्यामुळे गाईड घेणं गरजेचं वाटलं आणि...

भिंगरी महोत्सव २०२५

इमेज
अर्थीयन फाउंडेशनच्या भिंगरी महोत्सवाबाबत कल्पना होती. मागच्या वर्षी(२०२४) जाता आलं नाही परंतु यावेळची माहिती अनेकांकडून मिळाली. मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावात भिंगरी महोत्सव आयोजिला होता. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष.(२०२५) ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीच्या दुसऱ्या पर्वाची समाप्ती याच गावात झाली आणि त्यांच्या आगमनाने महोत्सवाला सुरवात झाली. स्टेज आणि प्रवेशद्वारावरील सजावट. गावात एखादा उत्सव असल्यावर सजावटीसाठी जशी लगबग असते अगदी तशीच लगबग या उत्सवासाठी सुरु होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी तसेच गावातल्या प्रत्येक घराच्या बाहेर फुलांच्या आणि रंगांनी भरलेल्या मोठमोठ्या रांगोळ्या. शिवाय गाव एकदम स्वच्छ होतं. गावातील मारुती मंदिराजवळचं मैदान गावातल्या तरुणांनी तसेच अर्थीयनच्या टीमने पूर्णपणे स्वच्छ केलं आणि छानपैकी सजावट करून स्टेज बनवला. या महोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी व नवीन काहीतरी शिकण्यासाठी पुणे, नाशिक, मुंबई, वापी अशा ठिकाणाहून पाहुणे मंडळी आली होती. मुलांनी काढलेले चित्रं. आलेल्या पाहुण्यांची गावातल्याच घरांमध्ये मोफत व्यवस्था करण्यात आलेली. गावातली माणसं इतकी प्रेमळ आहेत की, त्...

कुंभार्ली घाटातली वाघबारस

इमेज
वाघबारसविषयी मी ऐकून होतो. तलासरी भागात असल्यामुळे इथल्या वाघबारसची कल्पना आहे परंतु कुंभार्ली घाटात होणारी वाघबारस पाहायची उत्सुकता लागली ती सदफची पोस्ट पाहिल्यावर. खरं तर हा मागच्या वर्षीचा(२०२३) अनुभव आहे. चिपळूण येथे राणी आणि सदफ यांच्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेत(SCRO) पोचलो. तिथून आम्ही कुंभार्ली घाटच्या दिशेला निघालो. घाटमाथ्यावर किसरुळे, भाटी, केमसी आणि कासारखडकपाडा असे चार धनगर समाजाचे पाडे. त्यातील कासारखडकपाडा येथे वाघबारस साजरी करण्याकरिता तिकडे गेलो. कासारखडक पाड्यात एकूण पाच कुटुंब. साधारण पंचवीसेक लोकसंख्या.  पाड्यातल्या एका मोकळ्या जागेत गावकरी, लहान मुलं आणि वाघबारस बघण्याकरिता मुंबई, पुणे येथून आलेले आम्ही सारे जमलो होतो. वाघबारसकरिता आलेल्या पाहुणे मंडळींनी पाड्यातील लहान मुलांना रंगवायचे होते. थोडक्यात काय तर त्यांनी वाघ, बिबट्या, कोळशिंदा, अस्वल कसे दिसतात या कल्पनेतून मुलांचे चेहरे रंगवायचे होते. सर्वांनी ते केले शिवाय आमच्यातले काही जण स्वतः रंगण्यासाठी इच्छुक झाले. मग तिथल्या मुलांनी आमच्या चेहऱ्यावर वाघ, कोळशिंदा असे चित्र रेखाटले. वाघबारस दिनी पाड्...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

इमेज
पुस्तक - सत्तर दिवस लेखक -  रवींद्र गुर्जर युरुग्वे दक्षिण अमेरिकेतील एक छोटासा देश. त्या देशातील तरुणांनी रग्बी खेळात दोनदा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले होते. यावेळीही ते अजिंक्यपद पटकवण्यासाठीच निघाले होते. दिनांक १२ ऑक्टोबर १९७२. एअरफोर्सच्या 'फेअर चाईल्ड एफ २२७' ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. हिमालयसारख्या पर्वत रांगा या भागात आहे. विमान आकाशात झेपत असताना खराब हवामानमुळे त्यांचं विमान कोसळतं. आणि जगाशी संपर्क तुटतो. चहू बाजूने बर्फाच्छदित प्रदेश. यातून सुटका करण्याकरिता चिली, अर्जेंटीना सारखा नजीकचा देश सहकार्य करतो पण तो देखील अपयशी ठरतो. त्या बर्फाच्छदित प्रदेशात फसलेल्या पंचेचाळीस लोकांपैकी केवळ सोळा जणं जिवंत राहतात. त्या सोळा जणांनी अनुभवलेलं मरण या पुस्तकात कथित केलं आहे. मुबलक जेवण सोबत नाही तसेच संपर्क करण्याकरिता साधन नाही. जिवंत राहण्यासाठी काहीतरी खाणं आवश्यक होतं. म्हणून सोळा जणांनी नरमांस भक्षण करत सत्तर दिवस काढले. त्या सोळा जणांनी आपापसांत कामे वाटून तेथून बाहेर निघण्याचे प्रयत्न केले आणि त्यातून ते सुटले तब्बल सत्तर दिवसांनी. या सत्तर द...

कोहोज ट्रेक...

इमेज
सप्टेंबर महिन्यातला ट्रेक करिता ठरवलेला कोहोज किल्ला. यावेळी कोहोज किल्ल्याला जाण्याकरिता खूप उशीर झाला. नाणे गावमार्गे जाण्याचे नियोजन ठरले. स्थानिक दोन-तीन गावकरी आम्हाला दिले. पण त्यातले एकच जण आमच्या सोबतीला आला. प्रचंड पावसामुळे गवत आणि झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे जाणारी वाट समजून येतं नव्हती. 'शककर्ते शिवराय' समूहाने दिशादर्शक बाण असलेले पोस्टर लावलेले पण त्यावरील बाण स्पष्ट दिसत नव्हते. पायथ्याला आम्ही पंधरा-वीस मिनिटे रस्ता भरकटलो होतो. मार्गदर्शकाला पण ठाऊक नव्हतं. अखेर त्याने एक वाट दाखवत आम्ही त्यामार्गे निघालो. आणि गडाच्या मूळ वाटेशी पोचलो. सरळ उंच अशा चढाईचा किल्ला. रस्त्यात मोठमोठे दगड. आणि त्या पावसामुळे दगडांवर आलेले शेवाळे त्यामुळे पायही सरकत होते. अर्ध्या टप्प्यात गेल्यावर सरळ उंच अशी दगडांची रांग होती. एकमेकांचा हात देत मदत करत वर चढलो. हा अनुभव खूप थरारक होता. दोन टेकड्या चढल्यावर गडाच्या अर्ध्या रस्त्यात पोचतो. महादेव मंदिर परिसरात पाण्याचे टाके आहेत तसेच मंदिराच्या शेजारी दोन तोफा आहेत. मंदिराच्या समोर काही जुने अवशेष एका झाडाखाली रचून ...

पाटणादेवी मंदिर...

इमेज
लहानपणी अनेकांनी महादेवाच्या मालिका पाहिल्या असतील. त्यात राग आल्यावर महादेवाने तांडव नृत्य केल्याचं देखील पाहिलं असेल. त्याची कथा अशी होती की, दक्षप्रजापती यांनी एक यज्ञ केला होता. त्या यज्ञास दक्षप्रजापतीची सती नामक पुत्री आणि त्या सतीचे पती महादेव यांना निमंत्रण नव्हते. तरीही सती त्या यज्ञास जाते. आणि तिथे तिचा अपमान होतो. झालेल्या अपमानाची चीड येऊन सती त्या यज्ञात स्वतःचा देह टाकून देते. महादेवाला असे समजताच त्यांना प्रचंड राग येतो. महादेव सतीच्या शवाला जवळ घेतात व दक्षप्रजापतीचे मुंडके छाटतात. आणि तांडव नृत्य करायला लागतात. ते करत असताना त्यांचे तिसरे नेत्र उघडले जाते. त्यावेळी भगवान विष्णू सुदर्शन चक्राचा वापर करून सतीचे तुकडे करतात. सतीचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ती ती ठिकाणं शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाली. अशा अनेक आख्यायिका आजही ऐकायला मिळतात. पाटणादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली दीपमाळ... खान्देशातील चाळीसगावपासून अठरा किलोमीटर अंतरावर पाटणा हे गाव आहे. गावच्या नजीक गौताळा अभयारण्य आहे. त्यात चंडिकादेवीचं मंदिर(पाटणादेवी), हेमाडपंथी महादेव मंदिर, कन्हेर गड, पितळखोर...