पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भास्करगड उर्फ बसगड...

इमेज
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात असलेली डोंगररांग त्यास 'त्र्यंबक' डोंगररांग असेही म्हटले जाते. या डोंगररांगेत भास्करगड उर्फ बसगड वसलेला आहे. गोंदा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली. तेराव्या शतकात हा किल्ला यादवांच्या काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. बहामनी पाठोपाठ निजामशाहीने देखील हा किल्ला यादवांसोबत युद्ध करून ताब्यात घेतला. निजामशाहीच्या शेवटच्या काळात शहाजी राजेंनी बंड करून भास्करगड ताब्यात घेतला. पुढे तो किल्ला मोगलांनी जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून घेतला. १८१८ पर्यंत भास्करगड पेशव्यांच्या ताब्यात होता. भास्करगडाचे वैशिष्ट्ये म्हणजे कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि सर्पिलाकार मार्ग. या मार्गातून वर आल्यावर प्रवेशद्वार लागते. पूर्वी हा प्रवेशद्वार मातीच्या ढिगाऱ्यात गाडला गेल्यामुळे झोपून(सरपटून) जावे लागायचे. परंतु गडसंवर्धन करणाऱ्या चमुने तो ढिगारा काढून तेथे जाण्याचा मार्ग सुकर केला. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर गडाच्या माथ्यावर पाण्याचे टाके पहायला मिळतात. तेथेच मारुतीरायाची जुनी मूर्ती...