पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदिवासी, जग आणि फिरोजा ताफ्ती

इमेज
  पालघर जिल्ह्याच्या डहाणू शहरातही आदिवासी समाज आहे. त्यांची भाषा, राहणीमान हे सारं कालानुरूप बदलताना दिसत आहे. येणाऱ्या पिढीला त्यांच्या समाजाचे योगदान आणि सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून डहाणूच्या फिरोजा ताफ्ती १९९० पासून काम करत आहेत. त्यांचा पर्यावरणशास्त्रावर उत्तम अभ्यास आहे. फिरोजा मूळच्या मुंबईच्या. १९७९ साली त्यांचे लग्न डहाणूचे जहांगीर ताफ्ती यांच्याशी झाले आणि त्या डहाणूकर झाल्या. डहाणूच्या गंजाडजवळच पंधरा एकर जागेत त्यांची चिकुची वाडी आहे. तेथे त्या राहतात. चिकूच्या वाडीची संपूर्ण पाहणी त्यांचे पती पाहतात. वाडी जवळपासचा परिसर आणि तेथील संस्कृती फिरोजा यांना खूप भावली त्यामुळे त्या लोकांशी लवकर एकरूप झाल्या. जंगल म्हणजे आदिवासींचेच राज्य. हा समाज निसर्गपूजक आहे. स्वतःच्या गरजा आपण कशा सीमित ठेऊ शकतो हे या लोकांकडून सहज समजते. अशा गोष्टी हेरून येणाऱ्या पिढीला जाणीव निर्माण करून देण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. दिल्ली येथे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज(INTACH) नामक संस्था आहे. त्या संस्थेचे काम जगभर सुरू असते. संयुक्त राष्ट्र संघाने INTACH ला २००७ साली...

वन्यजीवांचे रक्षक - सृष्टी आणि सिद्धार्थ

इमेज
बीड जिल्ह्यातील शिरूर गावानजीक तागड गावात सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे या दाम्पत्यांनी वन्यप्राण्यांसाठी अनाथालय सुरू केले आहे. तेथे जखमी व आजारी जीवांवर उपचार केले जातात. सृष्टी-सिद्धार्थ यांना वन्यप्राण्यांविषयीची जाण लहानपणीच झाली. सिद्धार्थ यांच्या गावात भिल्ल समाज आहे. लहानपणी सिद्धार्थ आणि सृष्टी त्या समाजातील मुलांसोबत जंगलात पक्षी मारायला जायचे. त्यात त्यांना आनंद वाटायचा. त्यावेळी दोघांचे वय साधारण सहा-सात वर्ष. ससा, पक्षी पकडणं आणि सापाला हाताळणं त्यांना सहज जमत होतं. या सगळ्यांमुळे त्यांची वन्यप्राण्यांविषयी वाटणारी भीतीच नष्ट झाली. सिद्धार्थ इयत्ता दुसरीत असताना त्यांच्यासोबत एक घटना घडली. जंगलात फिरत असताना त्यांना 'विरुळा' नावाचा साप आढळला. ते पकडण्याचं धाडस त्यांनी केलं पण विरुळाने त्यांच्या बोटाला दंश केला. त्यावेळी गावात सापांविषयी अनेक गैरसमज होते. विरुळाने दंश केल्यावर नदीतलं गढूळ पाणी प्यायचं आणि मोहोळ खायची. हे सगळं सिद्धार्थ यांनी केलं त्यांना काहीच झालं नाही. सापांची माहिती घेत असताना त्यांना नंतर समजलं की तो साप बिनविषारी आहे. सापांविषयी थोडी माहिती मिळाल...

समाजाची भगिनी "निवेदिता"

इमेज
रोजगार हमी योजना, पेसा आणि वनहक्क कायदा या विषयांवर जव्हार येथील 'वयम् चळवळ' काम करते. मिलिंद थत्ते या चळवळीचे प्रमुख आहेत. २०१९ला 'वयम्'ने सोशल मीडियावर एका उपक्रमाविषयी आवाहन केले होते. गावातल्या मुलांबरोबर विविध प्रयोग किंवा खेळाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायचे. त्या बदल्यात गावातील मुलं जंगलफेरी आणि वन भोजन घडवून आणतील. ही संकल्पना आवडली. माझे मित्र विकास आणि परमेश्वर यांच्याशी बोलून जव्हार जाण्याची तारीख ठरवली. 'वयम्'च्या कार्यालयात तेथील कार्यकर्त्या निवेदिता यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सांगितल्यानुसार ठरलेल्या गावात गेलो. दोन दिवस आम्ही निवेदिता यांच्यासोबत गाव आणि जंगलफेरी केली. त्यांचा गावातील लोकांसोबतचा संवाद पाहून कामाविषयीचा प्रामाणिकपणा दिसत होता. निवेदिता मूळच्या पालघर येथील अंबोडे गावच्या. शालेय शिक्षण घेत असतानाच काही तरी वेगळं करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. घरची परिस्थिती जरा बेताचीच. दोन लहान बहिणी त्यांचा शिक्षणाचा खर्च आणि घर सांभाळणं यासाठी निवेदिता यांनी मेहनत घेतली. बारावी नंतर त्यांनी चार-पाच ठिकाणी नोकरी केली. पण तेथे त्यांचे मन रमले न...

गावरान गोधडीची ऊब सातासमुद्रापार.

इमेज
पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेने 'सामाजिक बांधिलकी' या उद्देशाने शहापूर तालुक्यातील खराडे गावात काम सुरू केले. हे गाव शहापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावातील एबीएम कातकरी व आदिवासी मुलींची शाळा मुंबई येथील माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून दत्तक घेतली. त्या शाळेला शासकीय अनुदान नसल्यामुळे ती बंद पडली होती. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी संस्थेच्या संचालकांनी माझगांव डॉक कंपनीला आर्थिक सहाय्य मिळणेबाबत पत्र व्यवहार केला. कंपनीने पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेशी संपर्क करून त्यांना शाळेची परिस्थिती आणि तेथील गरज जाणून घेण्यास सांगितले. कर्वे संस्थेने शाळेचा पायाभूत सर्व्हे करून आजूबाजूच्या परिसरातदेखील काम करण्याची आवश्यकता आहे असा अहवाल कंपनीस दिला. मार्च २०१५ पासून कंपनीने शाळा दत्तक घेत कर्वे संस्थेला मॉनिटरिंग करण्यास सांगितले. २०१५ ते २०२० या पाच वर्षांत कंपनीने शाळा आणि गावाच्या कामासाठी आर्थिक सहाय्य केले. २०२०मध्येच एबीएम कातकरी व आदिवासी मुलींच्या शाळेला शासकीय अनुदान मंजूर झाले आहे. आरती गिते यांच्यासोबत ऊर्जा महिला...

शूर हाली

इमेज
माझा मित्र स्वप्नील अधिकारी मूळचा शहापुरचा. सामाजिक कामानिमित्त आदिवासी पाड्यांना भेट देत असतो. शहापूर तालुक्यात 'हाली' नामक आदिवासी महिला तिने दाखवलेल्या धाडसामुळे प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी(२०१९) स्वप्नील आणि त्याचा मित्र मकरंद घनघाव हालीच्या घरी भेट द्यायला गेले होते. त्यांनी तिला भेट म्हणून साडी-चोळी दिली होती. या भेटीमुळे हालीने दाखवलेल्या शौर्याची आठवण झाली. स्वप्नील आणि मकरंद 'हालीला' साडी चोळी भेट देताना. शहापूर तालुक्याच्या नांदगाव जवळील जमन्याच्या पाड्यातील एका तबेल्यात रघुनाथ बरफ काम करतात. तेथून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रघुनाथ यांना शकुंतला आणि हाली या दोन मुली. शकुंतला थोरली आणि हाली तिची लहान बहीण. २०१२ सालची घटना आहे. रघुनाथ यांची लहान मुलगी हाली हिने बिबट्याच्या तावडीतून शकुंतलाची(मोठ्या बहिणीची) सुटका केली होती. शकुंतला गर्भवती होती. ती बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती. शहापूर तालुक्यात तानसा अभयारण्य आहे. तेथे वन्यप्राण्यांचा वावर असतो. या अभयारण्याच्या क्षेत्रात तानसा जलाशय आहे. हे जलाशय मुंबई सारख्या शहराला पाणी पुरवठा करते. पाड्...

'सुवर्ण'वेधी सायली

इमेज
शालेय उपक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेत माझे जाणे व्हायचे. त्या शाळेतील शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक सपकाळे सर आणि म्हात्रे सर यांच्याकडून सायली भंडारीविषयी ऐकून होतो. तिने वुशू खेळात राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नेतृत्वदेखील केले आहे. सायलीचे वडील दिनेश भंडारी हे शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी तरुण वयात मैदानी खेळ खेळले आहेत. देशासाठी एकदा तरी खेळायचे असे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते पण त्यावेळी घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. स्वतःचे राहिलेले स्वप्न उराशी बाळगून मुलांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. दिनेश यांना सायली आणि साहिल ही दोन मुलं. सायली ही मोठी मुलगी. ती चौथीला असताना(२०१४) तिच्या वडिलांनी तिला शाळेतच सेल्फ डिफेन्ससाठी कराटे क्लास लावून दिला. त्यावेळी तिचे कराटेचे प्रशिक्षक भगीरथ सर होते. कराटे शिकता शिकता ती वुशू खेळाची माहिती घेत राहिली आणि प्रशिक्षणाचे धडेही गिरवत राहिली. प्रयत्न म्हणून ती वुशू खेळाच्या स्पर्धेत २०१५ साली उतरली. ती तिची पहिलीच स्पर्धा. 'ऑल ...