पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोहोज ट्रेक...

इमेज
सप्टेंबर महिन्यातला ट्रेक करिता ठरवलेला कोहोज किल्ला. यावेळी कोहोज किल्ल्याला जाण्याकरिता खूप उशीर झाला. नाणे गावमार्गे जाण्याचे नियोजन ठरले. स्थानिक दोन-तीन गावकरी आम्हाला दिले. पण त्यातले एकच जण आमच्या सोबतीला आला. प्रचंड पावसामुळे गवत आणि झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे जाणारी वाट समजून येतं नव्हती. 'शककर्ते शिवराय' समूहाने दिशादर्शक बाण असलेले पोस्टर लावलेले पण त्यावरील बाण स्पष्ट दिसत नव्हते. पायथ्याला आम्ही पंधरा-वीस मिनिटे रस्ता भरकटलो होतो. मार्गदर्शकाला पण ठाऊक नव्हतं. अखेर त्याने एक वाट दाखवत आम्ही त्यामार्गे निघालो. आणि गडाच्या मूळ वाटेशी पोचलो. सरळ उंच अशा चढाईचा किल्ला. रस्त्यात मोठमोठे दगड. आणि त्या पावसामुळे दगडांवर आलेले शेवाळे त्यामुळे पायही सरकत होते. अर्ध्या टप्प्यात गेल्यावर सरळ उंच अशी दगडांची रांग होती. एकमेकांचा हात देत मदत करत वर चढलो. हा अनुभव खूप थरारक होता. दोन टेकड्या चढल्यावर गडाच्या अर्ध्या रस्त्यात पोचतो. महादेव मंदिर परिसरात पाण्याचे टाके आहेत तसेच मंदिराच्या शेजारी दोन तोफा आहेत. मंदिराच्या समोर काही जुने अवशेष एका झाडाखाली रचून ...

पाटणादेवी मंदिर...

इमेज
लहानपणी अनेकांनी महादेवाच्या मालिका पाहिल्या असतील. त्यात राग आल्यावर महादेवाने तांडव नृत्य केल्याचं देखील पाहिलं असेल. त्याची कथा अशी होती की, दक्षप्रजापती यांनी एक यज्ञ केला होता. त्या यज्ञास दक्षप्रजापतीची सती नामक पुत्री आणि त्या सतीचे पती महादेव यांना निमंत्रण नव्हते. तरीही सती त्या यज्ञास जाते. आणि तिथे तिचा अपमान होतो. झालेल्या अपमानाची चीड येऊन सती त्या यज्ञात स्वतःचा देह टाकून देते. महादेवाला असे समजताच त्यांना प्रचंड राग येतो. महादेव सतीच्या शवाला जवळ घेतात व दक्षप्रजापतीचे मुंडके छाटतात. आणि तांडव नृत्य करायला लागतात. ते करत असताना त्यांचे तिसरे नेत्र उघडले जाते. त्यावेळी भगवान विष्णू सुदर्शन चक्राचा वापर करून सतीचे तुकडे करतात. सतीचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ती ती ठिकाणं शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाली. अशा अनेक आख्यायिका आजही ऐकायला मिळतात. पाटणादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली दीपमाळ... खान्देशातील चाळीसगावपासून अठरा किलोमीटर अंतरावर पाटणा हे गाव आहे. गावच्या नजीक गौताळा अभयारण्य आहे. त्यात चंडिकादेवीचं मंदिर(पाटणादेवी), हेमाडपंथी महादेव मंदिर, कन्हेर गड, पितळखोर...

पुस्तक परिचय - कथा अणुस्फोटांची

इमेज
पुस्तक - कथा अणुस्फोटांची लेखक - निरंजन घाटे ११ मे १९९८ आणि १३ मे १९९८ रोजी भारतानं एकूण पाच अणुचाचण्या केल्या. यामुळे बहुसंख्य भारतीयांना खूप आनंद झाला. त्यावेळी बऱ्याच वाचकांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून आपापली मतंही व्यक्त केली. बहुतेकांचा सूर भारतीय शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा होता. या काळातच पुस्तकाची छपाई सुरू होती. वेगवेगळ्या देशांनी अणुबॉम्ब तयार करताना काय केलं याची माहिती या लेखांमधून आढळते. याप्रमाणे शत्रूपक्षाला बॉम्ब मिळू नये म्हणून इस्त्राईलसारखे देश कसे धडपडतात त्याचीही माहिती या पुस्तकात आहे. चोरट्या मार्गानं अणुबॉम्ब मिळवण्याचे प्रयत्नही दिसतील. भारतानं निर्माण केलेली अण्वस्त्र अशी चोरून मारून केलेली नाहीत तर भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचं ते फळ आहे. हे भारतीय अण्वस्त्रांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्यांना अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास आणि अण्वस्त्रधारी बनण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांनी कोणकोणते प्रयत्न केले याची माहिती हवी असेल. तर त्याची झलक या पुस्तकात बघायला मिळेल. - शैलेश दिनकर पाटील