पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कळसुबाई ट्रेक...

इमेज
कधी कधी अचानक ठरलेला प्लॅन तुम्हाला सुखद अनुभव देऊन जातो. महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट समजलं जाणारं सर्वात उंच शिखर 'कळसुबाई' येथे सूर्योदय पहायला म्हणे अनेकजण येत असतात त्याच भरतीमध्ये आम्ही पण सामील झालो. पण दिवस निवडला तो अगदी शुक्रवार रात्र आणि शनिवारच्या पहाटेचा. नाईट ट्रेकचा वेगळा अनुभव घ्यायचा होता. आकाशातून दिसणारे ग्रह-तारे.. मागच्यावेळी सावर्णे गावात मोहनच्या 'सुख सह्याद्रीत' नाईट कॅम्पिंगचा अनुभव घेतला होता. मोहननेच बारी गावातील सह्याद्री हॉटेलचे जनार्दन कचरे ह्यांचा संपर्क दिला. मग मुक्काम तिकडेच करायचं ठरलं. बारी गावात आम्ही रात्री एक वाजता पोचलो. तेथून जनाभाऊंच्या घरी आलो. तेच आमचे गाईड असल्यामुळे आम्ही एकमेकांची ओळख करत पहाटे तीनला ट्रेक सुरु करायचे ठरवले. आमच्याकडे तासभर वेळ होता. घराबाहेर खुर्च्या टाकून आम्ही बसलो. आकाशाकडे पाहिलं तर ग्रह-तारे अगदी स्पष्ट दिसत होते. मग नेहमी प्रमाणे मोबाईलमध्ये ऍप ओपन करून ग्रह-तारे चाळत बसलो. तेच चाळता चाळता आमच्या गप्पा सुरु होत्या. शिखरावरून दिसणारा सूर्योदय. पहिलाच नाईट ट्रेक असल्यामुळे गाईड घेणं गरजेचं वाटलं आणि...

भिंगरी महोत्सव २०२५

इमेज
अर्थीयन फाउंडेशनच्या भिंगरी महोत्सवाबाबत कल्पना होती. मागच्या वर्षी(२०२४) जाता आलं नाही परंतु यावेळची माहिती अनेकांकडून मिळाली. मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावात भिंगरी महोत्सव आयोजिला होता. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष.(२०२५) ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीच्या दुसऱ्या पर्वाची समाप्ती याच गावात झाली आणि त्यांच्या आगमनाने महोत्सवाला सुरवात झाली. स्टेज आणि प्रवेशद्वारावरील सजावट. गावात एखादा उत्सव असल्यावर सजावटीसाठी जशी लगबग असते अगदी तशीच लगबग या उत्सवासाठी सुरु होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी तसेच गावातल्या प्रत्येक घराच्या बाहेर फुलांच्या आणि रंगांनी भरलेल्या मोठमोठ्या रांगोळ्या. शिवाय गाव एकदम स्वच्छ होतं. गावातील मारुती मंदिराजवळचं मैदान गावातल्या तरुणांनी तसेच अर्थीयनच्या टीमने पूर्णपणे स्वच्छ केलं आणि छानपैकी सजावट करून स्टेज बनवला. या महोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी व नवीन काहीतरी शिकण्यासाठी पुणे, नाशिक, मुंबई, वापी अशा ठिकाणाहून पाहुणे मंडळी आली होती. मुलांनी काढलेले चित्रं. आलेल्या पाहुण्यांची गावातल्याच घरांमध्ये मोफत व्यवस्था करण्यात आलेली. गावातली माणसं इतकी प्रेमळ आहेत की, त्...