पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाप्पाला पत्र २०२० - गणेशोत्सव

इमेज
प्रिय गणपती बाप्पा, यावेळी तुझं आगमन आम्ही थाटामाटात करू शकलो नाही याची खंत कायम मनात राहील. इच्छा असूनही काहीच करता येत नाही नाईलाज आहे सगळा. संपूर्ण देशभर कोरोना रोगाची आपत्ती कोसळली आहे. मागच्या वर्षी तर पावसाच्या पाण्याने झोडपले होते. अनेकांचे घर पुरामुळे बुडाले होते. पै पै जमवलेलं सगळं वाहून गेलं. पण नव्या जोमाने आम्ही पुढे आलो आणि संसार पुन्हा नव्याने थाटला. आता सगळं सुरळीत असताना यावर्षी मात्र कोरोनाने वाट लावली. इथे ना नव्याने सुरवात करता येत, ना जवळच्या व्यक्तींना भेटता येतं. लॉकडाऊनमुळे काही जण दूरवर अडकले त्यांना स्वतःच्या घरीही जाता येईना. अशा परिस्थितीत नातेवाईकांकडे पण जाता येईना. आम्ही मोकळा श्वास घेत कोठेही जायचो पण मार्चपासून तोंडाला मास्क आणि सतत हात स्वच्छ ठेवणं हे आता गरजेचंच झालंय. लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसाची तर पूर्णतः वाट लागली आहे. दोन वेळचं जेवण करणारा माणूस आता काटकसरीनंच जगतोय. देशाचा अन्नदाता आपला शेतकरी बांधव त्याने राब राब राबून शेतात पिकं घेतली पण बाजारच बंद असल्यामुळे त्याला हवा तो भाव मिळाला नाही. मग घरात अन्न सडवण्यापेक्षा त्याने अगदी ...

'गुगल' नव्हे तर "गुरू"

इमेज
शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं जरा वेगळंच असतं. शिक्षकाला सतत वाटत असतं, की आपल्या हातून उत्तम विद्यार्थी घडावा, त्याने त्याचे आयुष्य सार्थकी लावावे. मी उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेत शिकलो त्या शाळेत अनेक शिक्षकांनी सहकार्य केलं. चांगलं शिकवलं. सगळ्या शिक्षकांमध्ये एक शिक्षक तर खास असतोच. आमच्या शाळेतले उल्हास चव्हाणके सर हे विद्यार्थीप्रिय आहेत असे म्हणायला हरकत नाही. शालेय शिक्षण संपल्यानंतरही ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात. कोणाचं काय सुरू आहे कोणी चुकीच्या मार्गाला नाही ना हे सतत तपासत असतात. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले त्यामुळे २०२० साली 'कोकणरत्न गुणवंत' पुरस्काराने सन्मानित केले. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना मिळाला. मी फोनवर शुभेच्छा दिल्या त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत ते म्हणाले, की 'अरे मी कुठे फार मोठं काम करतो.' मुळात काम दिसतंय म्हणूनच तर त्याचं फळ मिळतंय. चव्हाणके सर महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेचे माजी विद्यार्थीच. एक शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांशी चांग...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त...

इमेज
आदिवासी म्हटलं की नजरेसमोर येते त्यांची गरिबी, अशिक्षितपणा, अज्ञान वगैरे पण आता परिस्थिती हळूहळू का होईना बदलत चालली आहे. शिक्षक आणि उद्योग या क्षेत्राकडे अधिक प्रमाणात जाताना दिसतोय. संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी देखील शोधत आहेत. मी मूळचा कल्याणचा. पण नोकरीनिमित्त २०१५ पासून पालघरच्या तलासरी भागात स्थित आहे. नोकरीचे पत्र मिळाले आणि त्यावर कामाचे ठिकाण नमूद केले होते. पालघर सोडल्यास माझ्यासाठी बाकी ठिकाण नवीन होते. पत्र मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला हजर झालो. तिथली सगळी काम आटोपून बाहेर पडलो तर आजूबाजूचा माहोलच वेगळा होता. लोकांचे राहणीमान, बोलीभाषा पाहून असे वाटायचे की आपण इथे फार काळ टिकणार नाही. याआधी मी काही संस्थांच्या सोबतीला शहापूर, वाडा, विक्रमगड या आदिवासी भागात मदत केलेली आहे. पण तिथल्यापेक्षा हा भाग मला जरा वेगळा वाटला. ऑफिसचं काम आटोपून माघारी निघताना रस्त्यावर भली मोठी गर्दी दिसत होती जोरजोरात गाण्यांचा आवाज. जरा जवळ जाऊन पाहिलं तर ती मिरवणूक जागतिक आदिवासी दिनानिमित्त होती. आदिवासींच्या संस्कृतीशी निगडित सगळ्या गोष्टी त्या मिरवणुकीत पाहायला मिळाल्या. आदि...