पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तक परिचय - युद्ध जीवांचे..

इमेज
पुस्तक - युद्ध जीवांचे लेखक - गिरीश कुबेर गिरीश कुबेर लिखित युद्ध जीवांचे हाती आलं. आतापर्यंत असं वाटायचं, की शस्त्रविना युद्ध अशक्यच आहे. पण या पुस्तकात रासायनिक हल्ल्यांविषयी जे काही लिहिलं आहे ते फारच भयानक आहे. जगात खूप काही सुरू असतं पण सामान्य माणसांपर्यंत त्याची फारशी माहिती पोचत नाही. जैविक आणि रासायनिक युद्धांचा इतिहास या पुस्तकात मांडला आहे. विषारी वायूंची निर्मिती करणारे देश आणि त्यांनी त्यांच्या शत्रूराष्ट्रांवर केलेले हल्ले याची संदर्भासहित नोंद पुस्तकात आहे. बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू सारख्या विषाणूंची निर्मिती करून त्याच्यावर औषधी बनवून बाजारीकरण करणारे देश स्वतःला महासत्ताक समजतात. या रोगाच्या विषाणूंचा प्रयोग सामान्य माणसावर केला गेला.  हिरोशिमा नागासाकीवर केलेल्या हल्ल्यामुळे आपल्याला जपानवर कीव येते पण जपानही काही साधा भोळा नाही त्याने तर माणुसकीच्या सगळ्या हद्द पार केलेल्या आहेत. त्यांच्यावर अणुहल्ला का करावा लागला याचा तपशील लेखकाने सविस्तर मांडलेला आहे. हिटलर, विस्टन चर्चिल, जॉर्ज बुश, सद्दाम यांच्या दुष्कर्माचा उल्लेख यांत आहे. सद्दामसारख्या नराधमाला मदत करण...

येथेही आषाढीची यात्रा भरते...

इमेज
माझे मित्र सुनील यांच्या वडिलांकडून गोविंद महाराज यांच्याविषयी बरंच ऐकून होतो. आणि ते जाणून घेण्याची इच्छा होती. ऐन दिवाळीत गोविंद महाराजांच्या मंदिरात जाण्याचा योग आला. गावातील लोकं म्हणतात की, गोविंद महाराज हे संत तुकारामांचे अवतार होते. त्यांनी देखील अभंग रचले आहे. आणि त्या अभंगात तुकारामांचा उल्लेख आढळतो. गोविंद महाराज यांचा जन्म जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावातला. त्यांचा जन्म १७८५ सालचा. लहानपणापासून विठ्ठलाची भक्ती करणं आणि त्याचा जप करणं हे आवडीने करायचे. शिवाय तुकारामांच्या अभंगाचा प्रभाव त्यांच्यावर पडला असे म्हणायला हरकत नाही. गोविंद महाराज मंदिर.. भक्तीनादात अडकलेल्या गोविंद महाराजांचा विवाह करवून दिला. पण तरीही ते विठ्ठलाच्या भक्तीत लीन होते. असंच एके दिवशी ते जपनाम करत पंढरपूर पायी निघाले. त्यावेळी भाविक भक्त म्हणत की, गोविंद समर्थ पांडुरंग वेडे झालेत. अशा या गोविंद समर्थ महाराजांचे मंदिर पिंपळगाव हरेश्वर येथे आहे. गोविंद महाराजांची प्रतिमा आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ... आषाढी एकादशीवेळी गावात मोठी जत्रा भरते. वेगवेगळ्या गावांतून दिंड्या येतात. भाविका...