पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चालतं फिरतं ग्रंथालय

इमेज
वाचन संस्कृती रुजावी म्हणून काही वाचनालय किंवा संस्था विविध मार्गाने प्रयत्न करत असतात. तसाच काहीसा प्रयत्न बारामती येथील बेचाळीस वर्षीय राजेंद्र सुमंत करत आहेत. मागील सोळा वर्षांपासून(२००६) वाचकांसाठी पुस्तकं घरपोच पोचविण्याची सेवा देत आहेत. राजेंद्र सुमंत यांनी वाई येथील किसन वीर महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादन केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना साहित्य क्षेत्र आणि वाचनाची गोडी लागली. ते वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे १९९९ साली सभासद झाले. तेथे त्यांचे वाचन सुरू असायचे. वाचनालयात दुरून येणारे वाचक, तेथील व्यवस्था हे सारे त्यांच्या नजरेखालून जात होते. त्याच दरम्यान त्यांना वाचनालय सुरू करण्याची कल्पना सुचली. पण त्याचे नियोजन कसे करता येईल? या विचारांतच दोन-तीन वर्षांचा कालावधी गेला. राजेंद्र सुमंत घरगुती वाचनालय सुरू केल्यावर वाचक तेथपर्यंत पोचेल की नाही या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी पुस्तक घरपोच देण्याचा विचार केला. या निमित्ताने त्यांचा जनसंपर्कदेखील वाढणार होता. ०१ जानेवारी २००६ रोजी 'साहित्य संस्कृती' या नावाने ग्रंथालय' सुरू केले. त...

शालेय उपक्रम

इमेज
आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातील एक उपक्रम जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित केलेला. तो उपक्रम नेमका काय होता त्याविषयी जरा लिहिले आहे. मूळ पोस्ट २०१९ ची आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर लिहायला सांगितले होते. त्यांनी केलेले लिखाण वाचले. बरेच विद्यार्थी छान व्यक्त झालेत. त्या विद्यार्थ्यांना लिहायला काय देऊ हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता त्यातल्या त्यात एका पाड्यावरची शाळा जिथे घर, शाळा, शेती, काम, अभ्यास या पलीकडे काहीच नाही. त्या शाळेतल्या सरांशी बोलून काही विषय निवडायचे ठरले. माझे सहकारी विकास, ज्योती, उज्वला यांच्याशी चर्चा करून पंधरा-वीस विषयांची यादी तयार केली. इमारत कशी बांधली जाते? वर्तमानपत्रे आपल्या पर्यंत कसे पोचतात? परिसरातील बाजार? तुमच्या परिसरातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले व्यक्ती. वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल? हे विषय देण्यात आले. मुलींना मासिक पाळीविषयी लिहायला सांगितले. शाळेत शिकवलेलं घरी जाऊन अभ्यास करणे. त्यानंतर गप्पा गोष्टी आणि मस्ती. यापेक्षा जर त्यांना एखाद्या गोष्टीत गुंतवून त्यावर जर विचार करण्य...

"पर्यावरण संवर्धन यात्री - प्रणाली चिकटे"

इमेज
जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास याविषयी बरंच काही बोललं जातं पण त्यावर नेमकी कृती होत नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या पुनवट गावातली बावीस वर्षीय तरुणी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे हिने 'पर्यावरण संवर्धन यात्री' म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने ऑक्टोबर २०२० मध्ये पुनवट येथून सायकल भ्रमंतीसाठी सुरवात केली. एप्रिल २०२१ अखेर सात हजार किलोमीटरचा टप्पा पार करत तिने पालघर जिल्ह्यात प्रवेश केला. या सायकल भ्रमंतीतून ती पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे. प्रणालीने चंद्रपूरच्या पडोली येथील एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क येथून बीएसडब्ल्यू पदवी संपादन केली. पर्यावरण संवर्धन यात्री - प्रणाली चिकटे आई-वडील आणि तीन बहिणी असे तिचे कुटुंब. उदरनिर्वाहासाठी आई-वडील शेती करतात आणि दोन मोठ्या बहिणी शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. प्रणाली सगळ्यात लहान. शाळेत असतानाच तिला पर्यावरण या विषयात रुची होती. सततचे वातावरण बदल आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम या सगळ्यांविषयी तिला जाणीव निर्माण झाली. देश विकासाच्या दृष्टीने जरी जात असला तरी पर्यावरणाची जाणीव ठेवूनच विचार ...