पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पराक्रमी बिरसा

इमेज
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक लढले. भारतात विविध ठिकाणी उठावही झाले. हे सारे सुरू असताना आदिवासी बांधवांचेही छोटमोठे उठाव सुरू होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बिरसा मुंडा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. बिरसा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ साली झारखंडच्या रांची येथील उलीहातू गावात झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कुलमध्ये झाले. त्यांनी तरुण वयात अनेक समविचारी मित्रांना एकत्र केलं. आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारासाठी आपण इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले पाहिजे यासाठी त्यांनी अनेक तरुणांना संघटित केले.  बिरसा मुंडा संघटन करून उलगुलानची घोषणा केली. उलगुलान म्हणजे प्रचंड उलथापालथ, हल्लाबोल. शोषणाविरुद्ध, स्वतःच्या हक्कासाठी, खोट्या आरोपांच्या विरुद्ध उलगुलान, उलगुलान, उलगुलान... अशी ही उद्घोषणा. आदिवासी साहित्यात मुंडारी बोलीत बिरसा यांच्या पराक्रमाविषयी एक गीत लिहिलेले आहे. कैसा लियो हिंदुस्थान रे बिरसा कैसा लियो हिंदुस्थान ।।धृ।। बिरसा के हाथो में दो दो बंदूक थे । बिरसा के हाथो में दो दो तलवार थे । कमठे पे चढा दियो तीर नावे बिरसा रे । कैसा लियो हिंदुस्थान । हे वाचलं की स्फुरण ...